Public App Logo
Profile Picture

Basweshwar Dawle

@basweshwar170
208Followers
1Following
उदगीर शहरातल्या आडत /मोंढ्यातील घटना स्र्पे तोंडावर मारुण कोयता दाखवत व्यापार्‍याची बॅग पळवली
आमचे जिवलग मित्र
मा.सादुराम कांबळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उदंड, निरोगी व आनंदी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नगरपालिकेच्या बिलावर नगराध्यक्षांची सही रद्द!

नमुना ६४ वरील दशकभराचा वाद संपला; वित्तीय अधिकार एकट्या मुख्याधिकाऱ्यांकडे

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कारभारातील सर्वात वादग्रस्त विषयावर राज्य शासनाने अखेर पडदा टाकला आहे. पालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या बिलांना मंजुरी देणाऱ्या नमुना क्रमांक ६४ वर आता नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक नसेल. केवळ मुख्याधिकाऱ्यांची सहीच अंतिम ग्राह्य धरली जाणार आहे.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या उपायुक्त शीला पाटील यांनी ४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशात (जा.क्र. नपप्रसं/२०२६-२७/नमुना ६४/का-६/ E-2456593)* हे स्पष्ट केले आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव सुशीला पवार यांच्या ३१ ऑगस्टच्या मार्गदर्शक पत्रानंतर हा आदेश काढण्यात आला.

१० वर्षे वाद का सुरू होता?

१. मूळ कायद्यात अधिकार होते:१९६५ च्या कायद्यातील कलम ५८(a)(9)(b), ५८(a)(9)(d) आणि ७७(a)(9)(b) नुसार नगराध्यक्षांना वित्तीय व्यवहारांवर नियंत्रणाचा अधिकार होता. त्यामुळेच २०१३ च्या लेखा संहितेत नमुना ६४ वर दोघांच्याही सह्या बंधनकारक होत्या.

२. अधिसूचना आणि स्थगिती: १४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने लेखा संहितेत बदल केला. याला उच्च न्यायालयात (याचिका क्र. ९२७७/२०१५) आव्हान मिळाले आणि १५ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्यभर संभ्रम - कुठे एक सही, कुठे दोन सह्या.

३. २०१८ च्या कायद्याने चित्रच बदलले:३१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अधिनियम २५ नुसार सरकारने कायद्यातूनच नगराध्यक्षांचे वित्तीय अधिकार असलेली ती तीन कलमेच रद्द केली. त्यामुळे २०१५ च्या अधिसूचनेवरील वादच निरर्थक ठरला.

४. हायकोर्टाचा शिक्कामोर्तब:अखेर १६ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयाने सर्व याचिका (९२७७/२०१५, ९३१८८/२०१९, १४८४/२०२०) निकाली काढत स्थगिती उठवली.

शासनाचा अंतिम निष्कर्ष काय?

> "मूळ अधिनियम १९६५ मध्येच नगराध्यक्षांना वित्तीय नियंत्रणाचे अधिकार अस्तित्वात नसल्याने, त्यांनी नमुना ६४ वर मुख्याधिकाऱ्यांसोबत स्वाक्षरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

या एका वाक्याने राज्यातील २४०+ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सत्तासंघर्ष संपला आहे. यापुढे बिल मंजुरी, प्रमाणक आणि देयकांवरील अंतिम अधिकार केवळ मुख्याधिकाऱ्यांचाच असेल.
*लातूर पोलिसांची राष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी*

डिजिटल पोलिसिंगमध्ये लातूर देशात अव्वल, ई-साक्ष्य लिंकिंगमध्ये ९९.९८% कामगिरी

*लातूर, दि. ४ नोव्हेंबर -* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने लातूर जिल्हा पोलीस दलाने देशात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (NCRB) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ई-साक्ष्य आयडी निर्मिती आणि लिंकिंगमध्ये ९९.९८ टक्के कामगिरीसह लातूर जिल्ह्याने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यामुळे डिजिटल पोलिसिंगमध्ये लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे. या यादीत सिक्कीममधील एका जिल्ह्याने द्वितीय, तर हरयाणाच्या रेवारी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

*काय आहे ई-साक्ष्य प्रणाली?*
गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील फोटो, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावे अधिकृत पद्धतीने नोंदवून त्याला स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक (SID) देणे आणि तो संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडणे, म्हणजेच ई-साक्ष्य लिंकिंग. यामुळे पुराव्यांची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि न्यायालयीन प्रक्रियेत उपयोगिता वाढते.

*यशामागे टीमवर्क*
पोलीस अधीक्षक *अमोल तांबे* यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार या मोहिमेला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-अंमलदारांकडून हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून घेण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेचे *अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण* यांनी सातत्याने आणि बारकाईने मॉनिटरिंग केले. नियमित आढावा, सूचना आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी समन्वयामुळे हे राष्ट्रीय यश शक्य झाले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लातूरला डिजिटल पोलिसिंगमध्ये देशात अग्रेसर ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

> ही कामगिरी केवळ आकडेवारी नाही, तर लातूर पोलिसांची कार्यक्षमता, तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आणि उत्कृष्ट टीमवर्कचे प्रतीक आहे.
चाकूरमधील जबरी चोरी उघड; शतकवीर आंतरराज्यीय गुन्हेगारासह दोघे जेरबंद

लातूर :चाकूर तालुक्यात महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींपैकी एकावर चार राज्यांमध्ये १०१ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बुधवारी (दि. ३) नवीन रेणापूर नाका परिसरात दोन संशयित होंडा शाईन मोटारसायकलसह थांबल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दुपारी दोनच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले.

राहुल बादल बंजारा उर्फ पंडितसिंग धरमसिंग जुन्नी (५३, मूळ पाली, राजस्थान, सध्या परळी, बीड) आणि बच्चनसिंग मंगलसिंग बावरी (४५, परळी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, धारदार चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तिसरा साथीदार जगजितसिंग दुधानी हा फरार आहे.

मुख्य आरोपी राहुल बंजारा हा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रात ६८, गुजरातमध्ये २०, राजस्थानमध्ये ११ आणि कर्नाटकात २ असे एकूण १०१ गुन्हे दाखल आहेत. त्यात घरफोडी, दरोडा, दरोड्याची तयारी आणि प्राणघातक हल्ल्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उदगीर तालुक्यात अवैध सावकारांवर सहकार विभागाचा मोठा प्रहार; ५ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी

उदगीर (प्रतिनिधी) सर्वसामान्य शेतकरी व गरजूंना अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर सहकार विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. उदगीर शहर व तालुक्यातील पाच सावकारांच्या निवासस्थानांवर व दुकानांवर एकाचवेळी छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी भारत बायटेडवाड व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश रमेश अंबेसंगे (आनंतनगर, उदगीर), कोंडीबा तुकाराम मुंडे (जाधववाडी) व विलास शिवाजी बोरगावे (हंडरगुळी) या तिघांनी अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये ही धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ५ पथकांनी खालील ठिकाणी झडती घेतली -

१) साधू रामचंद्र कांबळे, संत रोहिदास नगर, उदगीर
२) पप्पू उर्फ संतोष पहाडे व राजीव बिरादार, नव्या मोंढा, उदगीर
३) फिरोजखान नामरुद्दीन पठाण, नगर परिषद कॉम्प्लेक्स, उदगीर
४) अमोल अशोक कोतळवार, मन रोड, उदगीर
५) विक्रम माने, हाळी, ता. उदगीर

झडतीदरम्यान कोरे धनादेश, कोरे मुद्रांक (स्टॅम्प), रोकडवही, जमिनीचे खरेदीखत, वसुलीच्या चिठ्ठ्या व आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आढळून आली असून पंचनाम्यानंतर ती ताब्यात घेण्यात आली आहेत.

विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक व्ही.एल. पोतारगळे व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी डी.बी. कांबळे, शरण देशमुख, आर.एस. गायकवाड, मुख्य लिपिक एस.जे. जाधव, जे.एस. घोले यांच्यासह १२ कर्मचाऱ्यांची पाच पथके तयार करण्यात आली होती. यासाठी महसूल, कृषी व दुय्यम निबंधक विभागाचे १० कर्मचारी पंच म्हणून तर पोलीस विभागाचे १० अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.

अवैध सावकारीला बळी पडलेल्या नागरिकांनी निर्भयपणे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उदगीर किंवा जिल्हा उपनिबंधक, लातूर यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उदगीर बस स्थानक | रात्री 9:30 | भटक्या कुत्र्यांचा थवा- <nis:link nis:type=tag nis:id=udgir nis:value=Udgir nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bus nis:value=Bus nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=stand nis:value=Stand nis:enabled=true nis:link/> 

नगरपालिकेचे सर्रास दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवाशी खेळ!

आज सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चा  बसस्थानकासमोरील हा व्हिडीओ आहे. शेकडो भटके कुत्रे रस्त्यावर मोकाट फिरत आहेत.  

शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतोय. रोज चावा घेण्याच्या घटना घडत असूनही नगरपालिका प्रशासन झोपेतच आहे.  

*प्रश्न:* नगरपालिका कर वसुली करते, पण नागरिकांच्या सुरक्षेचं काय?  

तुमच्या भागातही अशीच परिस्थिती आहे का? कमेंट करून सांगा.  

<nis:link nis:type=tag nis:id=उदगीर nis:value=उदगीर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भटकेकुत्रे nis:value=भटकेकुत्रे nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नगरपालिका nis:value=नगरपालिका nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=udgir nis:value=Udgir nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturnews nis:value=LaturNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=straydogs nis:value=StrayDogs nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=publicissue nis:value=PublicIssue nis:enabled=true nis:link/>
उदगीर शहरात होत असलेली अनेक बेकायदेशिर बांधकाम मुख्याधिकारी यांना दिसत नाहीत का? रस्त्याचे मोजमाप घ्या,नगररचनेच्या कोणत्या मापामध्ये किती बांधकामे होत आहेत हे जरा निट तपासा ...व्यावसायिक इमारतीच्या पार्कींग पहा कुठे आहेत ..
बनशेळकी येथील ग्रामदैवत महादेव मंदिरात आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महाआरती; टाळ वाजवत झाले मंत्रमुग्ध

उदगीर, दि. 28 (प्रतिनिधी) -पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील ग्रामदैवत श्री महादेव मंदिरात माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महाआरती व पूजन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

श्रावण महिन्यानिमित्त येथील महादेव मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व आरती होत असते. त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार संजय बनसोडे यांनी मंदिरात येऊन महादेवाचे दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

फुलांनी सजले मंदिर -यानिमित्त मंदिराला झेंडू, शेवंती व गुलाबाच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळा व आरास यामुळे मंदिराचा गाभारा खुलून दिसत होता.

आरती सुरू असताना आमदार बनसोडे यांनी स्वतः हातात टाळ घेऊन ठेका धरत भजनात तल्लीन होत महादेवाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या भक्तिभावाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते दिलीपकुमार मटके, वसंत पाटील, लक्ष्मीताई श्रीमंडळे, कमलाकर फुले, बब्बर सय्यद, सारंग लोहारे, महादेव पाटील, उमा लोहारे, संकेत बिरादार, मन्मथ स्वामी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता.
हंडरगुळी येथे पोलीस कर्मचार्‍यावर मयताचे नातेवाईक भडकले

हंडरगुळी येथील रामदास बोळेगावे यांनी सावकाराच्या ञासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकणी मयताचे भाऊ विलास बोळेगावे यांनी कुणावर केलेत गंभीर आरोप पहा ..
हंडरगुळी येथील रामदास बोळेगावे यांनी सावकाराच्या ञासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकणी मयताचे भाऊ विलास बोळेगावे यांनी कुणावर केलेत गंभीर आरोप पहा ..
लातुर जिल्ह्यात विविध ठिकाणी तीन मृतदेह आले आढळून
Video 12
एक सप्टेंबर पासून हेल्मेट सक्ती,सर्वानी हेल्मेट वापरावे- पोलीस अधिक्षक अमोल तांबे याचे आवाहन ..
उदगीर शहरातील समतानगरमध्ये धोकादायक विद्युत पोल ; नागरिकांच्या जीवाला धोका

उदगीर : उदगीर शहरातील समतानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विजेचे पोल वाकलेल्या अवस्थेत आहेत. हे पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून त्यावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे शेजारील घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

या वाकलेल्या पोलमुळे पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तरीही महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

येथील धोकादायक विद्युत पोल तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन पोल बसवावेत, अशी मागणी समतानगर येथील नागरिकांमधून जोर धरत आहे.
अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; उदगीर तालुक्यात पत्रकारांकडून 11 गावांत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 
उदगीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनापुरता कार्यक्रम न घेता उदगीर तालुका पत्रकार जयंती महोत्सव समितीने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. समितीच्या वतीने उदगीर तालुक्यातील 11 गावांतील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नावंदी, नळगीर, सोमनाथपूर, लोणी, वाढवणा, शेल्लाळ, मलकापूर, हेर, निडेबन, रावणगाव आणि लोहारा या दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन पत्रकारांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. "शिक्षण हेच खरे हत्यार" हा अण्णाभाऊंचा विचार कृतीतून पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पत्रकारांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमधून सर्वत्र कौतुक होत आहे.

हा संपूर्ण उपक्रम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, उपाध्यक्ष अर्जुनराव जाधव, सचिव सुनील हवा पाटील, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, सहसचिव विश्वनाथ गायकवाड, कोषाध्यक्ष नागनाथ गुट्टे आणि संघटक बसवेश्वर डावळे यांच्या पुढाकारातून आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
आज सकाळी शेल्हाळ रोडच्या शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या घटनेच्या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मोठा जनसमूदाय जमलेला असून नेमकी काय घटना घडली आहे याचे कारण माञ अद्याप अस्पष्ठ असून, घात की अपघात ? याचा शोध पोलीस घेणार का? असाही सवाल आता नागरीक करीत आहेत
Video 17
अंधश्रद्धेचा काळा डाव उधळला! पोक्सो व अघोरी प्रथा कायद्यान्वये गुन्हा दाखल

"पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा कट रचणाऱ्या 15 जणांच्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ही घटना 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अघोरी विधी करण्याचे नियोजन केले होते.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 चे कलम 3(3) आणि पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत.

*आरोपींची नावे:* 
1. कुंडलीक देवराव रूपनर - बीड
2. सचीन साहेबराव भोंगळे - अकोला  
3. अनिकेत सुभाष राठोड - परभणी
4. समीर टिनघरे - पुणे
5. लक्ष्मण विठ्ठल करंजी - संगारेड्डी, तेलंगणा
6. सनेश सुकुमार पनिके - संगारेड्डी, तेलंगणा
7. दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला - संगारेड्डी, तेलंगणा  
8. श्रीनिवास विरख्या चिलमुला - संगारेड्डी, तेलंगणा
9. बालाजी रघुनाथराव बिरादार - संगारेड्डी, तेलंगणा
10. चंद्रया सुंदरराव कारम - पश्चिम गोदावरी, आंध्रप्रदेश
11. अनंतराव गंगाराम खुनिकार - रंगारेड्डी, तेलंगणा
12. राजेश मोगली ईपन्नापल्ली - हैद्राबाद
13. सुनिल कल्याण डेंगले - पुणे
14. राजू सेवु पवार - विजापूर, कर्नाटक
15. बालाजी - पूर्ण नाव माहित नाही

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
"पैसे की बारिश" कराने के लिए अघोरी विधि का षड्यंत्र, 15 आरोपियों पर पॉक्सो और नरबलि कानून के तहत मामला दर्ज

_उदगीर, दि. 16:_ पैसे पाने के लिए अंधविश्वास में आकर नाबालिग लड़की का इस्तेमाल कर अघोरी विधि करने की कोशिश करने वाले गिरोह का उदगीर ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में 4 राज्यों के 15 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया है।

16 अगस्त 2026 की सुबह 2 बजे लातूर-उदगीर रोड पर करडखेल फाटा के पास यह घटना हुई। पुलिस नाईक संतोष शिंदे की शिकायत पर उदगीर ग्रामीण पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर नंबर 577/2026 दर्ज हुआ है।

आरोपियों ने मिलकर "लक्ष्मी पूजा" के नाम पर अंधविश्वासी विधि करने की योजना बनाई थी। इसके लिए महाराष्ट्र नरबलि और अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 की धारा 3(3) के साथ-साथ पॉक्सो कानून की धारा 12 और 18 लगाई गई हैं।

मामले में पीड़ित 15 वर्षीय लड़की आंध्र प्रदेश के श्रीकाकुलम जिले की रहने वाली है। आरोपियों में बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक के मजदूर, ड्राइवर और व्यवसायी शामिल हैं।

इस मामले की जांच पुलिस निरीक्षक डी.डी. गाडे कर रहे हैं। पुलिस ने बताया कि समय पर कार्रवाई होने से एक बड़ी अनहोनी टल गई।

पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी तरह के अंधविश्वास का शिकार न बनें।
"पैसाचा पाऊस" पाडण्यासाठी अघोरी विधीचा कट, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पंधरा आरोपींवर पोक्सो व नरबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल

उदगीर, दि. 16 : पैसा मिळविण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुलीचा वापर करून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 4 राज्यांतील 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2 वाजता लातूर-उदगीर रोडवरील करडखेल पाटीजवळ हा प्रकार घडला. पोलीस नाईक संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 577/2026 दाखल झाला आहे. 

आरोपींनी संगणमत करून "लक्ष्मीपूजा" च्या नावाखाली अंधश्रद्धेय विधी करण्याचे नियोजन केले होते. यासाठी महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम 2013 चे कलम 3(3) तसेच पोक्सो कायद्याचे कलम 12 सह 18 लावण्यात आले आहेत.

गुन्ह्यातील पीडित 15 वर्षीय मुलगी आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील आहे. आरोपींमध्ये बीड, अकोला, परभणी, पुणे, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील मजूर, चालक व व्यावसायिकांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे करत आहेत. वेळीच कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
गंगापूर ग्रामसभेत राडा! भ्रष्टाचाराचे आरोप होताच ग्रामसेवकांनी सभा अर्धवट सोडली

उदगीर तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शुक्रवारी चांगलाच गोंधळ झाला.  
ग्रामस्थांनी ग्रामसेवक भाग्यश्री आमले आणि सरपंच जयश्री बिरादार यांच्यावर ग्रामविकास निधीच्या गैरव्यवहाराचे थेट आरोप केले.  

वाद इतका वाढला की ग्रामसेवकांनी सभा सोडून काढता पाय घेतला. संतप्त ग्रामस्थांनी "भ्रष्ट ग्रामसेवकांना हटवा" अशा घोषणा दिल्या.  

पुढील ग्रामसभा आता *20 ऑगस्ट 2026* रोजी होणार आहे. त्यावेळी लेखी उत्तर देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.  

*प्रश्न:* गावाचा विकास करायला बसलेल्यांवरच ग्रामस्थांचा विश्वास नसेल, तर कारभार पारदर्शक कसा होणार? 🤔  

<nis:link nis:type=tag nis:id=लातूर nis:value=लातूर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=उदगीर nis:value=उदगीर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गंगापूर nis:value=गंगापूर nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ग्रामसभा nis:value=ग्रामसभा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भ्रष्टाचार nis:value=भ्रष्टाचार nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=laturnews nis:value=LaturNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtra nis:value=Maharashtra nis:enabled=true nis:link/>

---
Video 22
उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. नांदेड रोडवरील एका बंद पडलेल्या पॅलेस हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

हॉटेल चालक अहमद जलील बागवान हा बाहेरून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमीत्य पञकार जयंती महोत्सव समिती उदगीर यांच्या वतीने मौजे मलकापुर येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले..