एका विद्यार्थ्याने जीव गमावला… आता तरी MPSC आणि सरकार जागे होणार का?
MPSCची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत वेदनादायक आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणाचा असा अंत होणे, ही केवळ कौटुंबिक शोकांतिका नाही; तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.
पेपरफुटी, कथित गैरप्रकार, निकालांबाबतचे प्रश्न आणि वारंवार बदलणारे नियम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास वाढत आहे.
ग्रामीण आणि दुष्काळी भागातून अनेक विद्यार्थी उधार-उसनवारी करून पुण्यात येतात. वर्षानुवर्षे परीक्षा, निकाल आणि नियमांच्या अनिश्चिततेत अडकलेल्या विद्यार्थ्यांवर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढत आहे.
MPSC आणि सरकारला काही थेट प्रश्न…
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाची तयार�
Haveli, Pune | Sep 9, 2026