बिहारमध्ये पुराचा कहर; दोन मजली घरंही पाण्याखाली!
बिहारमध्ये पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिस्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज यावरून लावा की, आता दोन मजली घरांमध्येही पाणी शिरले आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 47 लाखांहून अधिक नागरिक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे चापाकलही पाण्याखाली गेले आहेत.
लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांसमोर सुरक्षित निवारा, अन्न आणि पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
मात्र प्रश्न असा आहे—या भीषण परिस्थितीत मदतीसाठी सरकार आता नेमक्या कोणत्या ‘करिश्मा’ची वाट पाहत आहे?
#BiharFlood #BiharFloods #FloodCrisis #BiharNews #BreakingNews
Pune City, Pune | Sep 12, 2026