सातारा: २१ तारखेपर्यंत ईव्हीएममध्ये घोळ होणार; आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली भीती
Satara, Satara | Dec 3, 2025 राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सातारा येथील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाचा कारभार “महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा” झाल्याचे विधान करत आयोगावर थेट निशाणा साधला.