वाशिम जिल्ह्यातील जऊळका ते अमाणवाडी या ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्ता उखडल्याने वाहन चालकांना वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे.समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी या मार्गावरून गौणखनिजाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, त्यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.याचबरोबर जऊळका ते वरदारी खुर्द दरम्यानचा पूल जीर्णावस्थेत असून तो धोकादायक स्थितीत आहे.या रस्ता व पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली असली तरी बांधक