मुरुड: पावसाळी पर्यटनावर बंदी नको, निर्बंध घाला
Murud, Raigad | Jul 3, 2026 रायगड जिल्ह्यातील पर्यटन पावसाळी विविध ठिकाणच्या धबधब्यांमुळे बहरते. आता पावसाचा जोर वाढल्याने लवकरच जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र मागील काही वर्षात या पर्यटन स्थळांवर दुर्घटना घडल्या असल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करून मोठे निर्बंध घातले जातात. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर बंदी न घालता ठराविक निर्बंध घालावे, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.