हिंगणघाट: दरवर्षी विज कोसळून होणारे शेतकरी व मजुरांचे मृत्यू रोखण्यासाठी अर्लट यंत्रणा बसवा: आमदार कुणावार
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज २ जुलै रोजी ११ वाजता हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दरवर्षी विज कोसळून होणारे हजारो लाखो शेतकरी व शेतमजुरांचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने विज कोसळण्याच्या ४५ मिटांन पुर्वी अलर्ट देणारी यंत्रणा बसवून होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी सभागृहात केली आहे.