Public App Logo
Profile Picture

Jilha Varta (जिल्हा वार्ता)

@jilhavarta
175Followers
0Following
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे मुक्कामी आहे. यानिमित्ताने आज सायंकाळी समाज आरती मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. लाखो वारकरी, भाविक आणि मान्यवर या सोहळ्यात सहभागी होतात
इंडियन आयडॉल अंतिम फेरीत आपल्या डोंबिवलीच्या
मराठमोळ्या अंशिका चोणकर हिला जास्तीत जास्त
 मत देऊन विजयी करा...
ठाकुर्ली चोळेगाव परिसरात रस्त्यालगतचे झाड कोसळले, वाहनाचे नुकसान

सुदैवाने कोणी जखमी नाही, धोकादायक झाडांबाबत वारंवार तक्रार करूनही KDMC प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
कोरोना काळात काहीजण दाढी वाढवून कोकणात
 जाऊन बसले होते- . मनसे नेते राजू पाटील यांचा
 निशाणा कुणावर ,राजकीय वर्तुळात चर्चा
कल्याण-डोंबिवलीतील 3.25 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; 220 केव्ही पडघा-पाल वीजवाहिनी ट्रिप

 कल्याण-डोंबिवली परिसराला वीजपुरवठा करणारी 220 केव्ही पडघा–पाल वीजवाहिनी आज सायंकाळी 7:40 वाजता ट्रिप झाल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. या बिघाडामुळे सुमारे 3.25 लाख ग्राहक अंधारात गेले.या तांत्रिक बिघाडामुळे 22 केव्ही सोनारपाडा, कासा रिओ, कासा बेला, नेतीवली (अंशतः), एपिक, डाउनटाऊन, लेकशोर, उसाटणे आणि लोढा प्रीमियर या उपकेंद्रांवरील वीजपुरवठा बंद झाला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम तातडीने हाती घेतले असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, कल्याण पूर्व यांनी दिली.
KDMC सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे स्थायी समितीच्या सभेत अनुपस्थित ,स्थायी समिती सदस्य संतापले
सहाय्यक आयुक्त आयुक्तांपेक्षा मोठे आहेत का ? 
 सदस्यांचा थेट सवाल
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त 
सचिन तामखेडे यांच्या सातत्याने गैरहजेरीवरून मोठा वाद निर्माण झाला. "सर्व सहाय्यक आयुक्त सभेला उपस्थित राहतात, मग ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्तच वारंवार अनुपस्थित का राहतात? ते आयुक्तांपेक्षाही मोठे आहेत का?" असा संतप्त सवाल समिती सदस्यांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले.
ई प्रभागाशी संबंधित विषय चर्चेला आल्यानंतर सहाय्यक आयुक्त तामखेडे सभागृहात नसल्याचे निदर्शनास येताच भाजपचे स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "त्यांना तातडीने सभेत पाचारण करा. प्रत्येक बैठकीत त्यांच्याक
कल्याण मलंगरोड नांदीवली ते द्वारली येथील रस्त्याची दुर्दशा, रस्त्याची तात्पुरती डागडुजी नको ,गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थतीतीत करा अन्यथा अधिकाऱ्याना खुर्चीत बसू देणार नाही - शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड संतापले आणि दिला KDMC अधिकाऱ्यांना इशारा
साडेदहा कोटीच्या टँकर पाणीपुरवठ्याला मंजुरी
पाणी टँकरवर GPS प्रणाली बसवण्यासह
पाणी पुरवठा होत नसलेल्या भागात मोफत टँकर देण्याचे प्रशासनाला दिले आदेश
 स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांची माहिती
गोळवली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत
 वह्यांचे वाटप; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली
कुणाल पाटील यांच्या हस्ते उपक्रम
कल्याण कोर्टात खळबळ! महिला वकिलांचे फोटो-डेटा एअरड्रॉपद्वारे ट्रान्सफर केल्याचा आरोप;  वकिलाला रंगेहात पकडून  चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात

 कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात एका वकिलावर 
महिला वकिलांचे फोटो आणि डेटा मोबाईलमध्ये ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप.

 एडवोकेट महेश जाधव यांच्याकडून गेल्या काही 
दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा महिला वकिलांचा दावा.

 आज एका महिला वकिलाने संशयित प्रकार रंगेहात 
पकडल्यानंतर न्यायालय परिसरात मोठा गोंधळ.

संतप्त महिला वकिलांनी महेश जाधव यांना बेदम 
मारहाण करत महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले.

आयफोनमधील एअरड्रॉप सुविधेचा वापर करून फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतल्याचा आरोप.

 ट्रान्सफर केलेल्या फोटो- व्हिडिओंचा वापर कशासाठी केला जात होता? याचा तपास महात्मा फुले पोलीसांकडून सुरू
स्मार्ट मीटर सक्ती विरोधात काँग्रेस आक्रमक

खबरदार स्मार्ट मीटर सक्ती कराल तर - काँग्रेस गटनेते कांचन कुलकर्णी यांचा महावितरण ला इशारा
रिपब्लिकन सेना शिवसेना युतीच्या नगरसेविका माया 
कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील गरीब
 गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप ,नागरिकांना
 छत्र्यांचे वाटप
मेट्रोमोनियल साईटवर महिलांना संपर्क साधून त्यांचे  लैंगिक शोषण करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या  भामट्याला विष्णुनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या असहाय्य , विधवा घटस्फोटीत महिलांना लक्ष करत करत होता लूट ... देशभरात विविध राज्यातील महिलांची केली फसवणूक
कल्याणातील ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या; माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
कल्याण :कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन - संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजां�
कल्याण आडीवली येथील धक्कादायक घटना
जुन्या वादातून तरुणाची हत्या , मैत्रीण जखमी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

कल्याण : कल्याण आडवली परिसरात काल मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली . कल्याण आडीवली परिसरात राहणारा अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या हा आपल्या मैत्रिणीचा उद्यानात बसला होता
 . याच दरम्यान त्याच्याशी काही महिन्यापूर्वी वाद झालेला अविनाश झा आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी आला . या दोघांचा पुन्हा त्याच ठिकाणी वाद झाला व या वादातून अविनाश झा आणि त्याच्या साथीदाराने अर्जुन वर धारदार शस्त्राने हल्ला केला. अर्जुन उर्फ पेंद्या मैत्रीण देखील या हल्ल्यात जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अर्जुन याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .. पोलिसांनी अविनाश झा आ�
डोंबिवली पूर्व पी अँड टी कॉलनी मधील शिव प्राईड इमारतीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास शिरले चोर !

चोरट्यांचा प्रयत्न फसला चोरटे CCTV मध्ये कैद
कल्याण पश्चिम वायले नगर परिसरात टेम्पो पलटी ,
टेम्पो चालकासह एका महिलेस दुखापत ,टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती
कल्याण हादरलं! आईच्या कुशीतून ६ महिन्यांच्या आर्यनचे अपहरण
झोपेचा फायदा घेत चिमुकल्याचे अपहरण
कल्याण स्टेशनबाहेर खळबळ ,महात्मा फुले पोलीस ठाण्याची चार  विशेष पथके शोधात
कल्याण - कल्याण स्टेशन बाहेरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे उड्डाणपूल खाली झोपलेल्या महिलेच्या कुशीतून अवघ्या सहा महिन्याचा आर्यन या चिमुकल्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . अपहरणकर्त्याने बाळासोबत महिलेचा मोबाईलही चोरून नेलाय. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके सक्रिय केली आहे
दादरा नगर हवेलीहून आलेल्या महिलेवर दुर्दैवी प्रसंग..
दादरा नगर हवेली येथील रहिवासी रोशनी साहू या काही कामानिमित्त कल्याणमध्ये आल्या होत्या. सोमवारी रात्री त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलगा आर्यनसह कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड�
चांदोबाचा लिंब येथे पार पडले पहिले उभे रिंगण
माउलींच्या जयघोषात भक्तिमय वातावरण
शिवसेना उबाठाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे याच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड शिबिराचे आयोजन
डोंबिवली आजदे पाडा सागर्ली परिसरात उघडे विद्युत बॉक्स ठरतायत धोकादायक
भाजप नगरसेविकेच्या तक्रारीकडे  महावितरण अधिकऱयांचे दुर्लक्ष 

डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरातील
 सागरली भागात विद्युत पुरवठा करणारे अनेक इलेक्ट्रिक बॉक्स उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उघड्या विद्युत बॉक्समुळे नागरिकांना विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढला असून परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी संबंधित वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उघडे व�
डोंबिवली पूर्व पश्चिम स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना माजी नगरसेवक शैलेश धात्रक आक्रमक

स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करा टोविंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू करा 

पंधरा दिवसात वाहतूक कोंडीवर ठोस उपाय योजना न केल्यास आंदोलन .. माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांचा वाहतूक पोलीस प्रशासनाला इशारा

डोंबिवली :- डोंबिवली पूर्व ,पश्चिम स्टेशन परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते . स्टेशन परिसरात बेशिस्त वाहन चालक मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे गाड्या पार्क करत असल्याने या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडते . त्यामुळे स्टेशन परिसरात वाहन चालकांची मात्र चांगलीच दमछाक होते .वाहतूक पोलिसांचे टोविंग व्हॅन सेवा बंद असल्याने अशा वाहनांवर कारवाई करता येत नाही याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक विभागाला पत्र पाठवले आहे . स्टेशन परिसर
शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार जनजागृती कार्यशाळा संपन्न

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय अन्नसुरक्षा व सकस आहार विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडली.

कार्यशाळेत Food Safety and Standards (Safe Food and Balanced Diets for Children in School) Regulations, 2020 या नियमावलीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) योजनेची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार उपलब्ध करून देणे, स्वच्छता आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शाळांमधील सुरक्षित अन्न व्यवस्थापन, स्वच्छ स्वयंपाकगृह, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, अन्न साठवणूक तसेच High Fat, Sugar and Salt (HFSS) युक्त खाद्यपदार्थांच्या विक्री व जाहिरातीवरील निर्बंध याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २७५ शाळांचे मुख्याध्यापक, समूह साधन केंद्रप्रमुख, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रतिनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी तसेच मध्यान्ह भोजनाशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पोषणमूल्ययुक्त आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच अन्नसुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
लोणंद ते तरडगाव... पाऊले चालती पंढरीची वाट!

लोणंद नगरीतून आज वारकऱ्यांचा अखंड हरिनाम गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात माउलींच्या पालखीचे तरडगावकडे प्रस्थान झाले. भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि भक्तीच्या उत्साहाने भारलेले वातावरण अनुभवण्यासाठी मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली.

वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध दिंड्या, अभंग-भजनांचा अखंड नाद आणि विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा महासागर लोणंद ते तरडगाव मार्गावर पाहायला मिळाला. पंढरपूरच्या दिशेने सुरू असलेला हा भक्तिमय प्रवास भाविकांसाठी श्रद्धा, समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.
जगन्नाथांच्या टायपोग्राफी कलेची अनोखी निर्मिती; 'जय जगन्नाथ' शब्दातून साकारली आकर्षक कलाकृती

रथयात्रा उत्सवानिमित्त प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार सादर करत भगवान जगन्नाथांची आकर्षक टायपोग्राफी कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्र हे "जय जगन्नाथ" हा शब्द तब्बल एक हजार वेळा लिहून तयार करण्यात आले आहे.

भक्ती, कला आणि कल्पकतेचा सुंदर संगम असलेल्या या कलाकृतीने कला रसिकांसह भाविकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. रथयात्रा उत्सवाच्या पावन निमित्ताने भगवान जगन्नाथांप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा एक अभिनव आणि प्रेरणादायी प्रयत्न असल्याचे प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी सांगितले.

या अनोख्या टायपोग्राफी कलेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, धार्मिक भावनेला कलात्मक अभिव्यक्तीची जोड देणारी ही कलाकृती अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.