Public App Logo
Profile Picture

Jilha Varta (जिल्हा वार्ता)

@jilhavarta
183Followers
0Following
कल्याण पूर्वेतील जागेच्या वादाने घेतलं राजकीय वळण !

,रूम मालकाचा विकासकाने रूम तोडल्याच्या आरोप,विकासकाचा शिवसेनेचे नगरसेवक नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

महेश गायकवाड यांनी विकासकाच्या आरोपांचे खंडन करत आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह माजी आमदार गणपत गायकवाड त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप

तर यांबाबत वैभव गायकवाड यांनी या संदर्भातील आरोपांशी आमचा कोणताही संबंध नाही. हा त्यांचा वाद असून, आमचे नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने आमच्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. या खोट्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.
कल्याण मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक
शिवसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील नगरसेवक रोहन कोट यांनी नागरिकांना दिल्या नारळी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा..
*नेपाळमध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी/नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा*
 *-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन*

ठाणे : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.
 या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जे पर्यटक/नागरिक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
 *माहिती देताना खालील तपशील उपलब्ध करून द्यावेत:-*
• संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव
• मोबाईल क्रमांक
• नेपाळमधील
श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्साह; श्री गोगादेवाची छडी दाखल, नाथांच्या गीतांनी गड दुमदुमला!

कल्याणजवळील ऐतिहासिक श्री मलंगगडावर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मलंग मत्स्येंद्रनाथांना नारळी भाताचा नैवेद्य दाखवून भाविकांनी नारळ अर्पण केला.

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री गोगादेवाची पवित्र छडी श्री मलंगगडावर दाखल झाली होती. यावेळी श्री नाथांचे पारंपरिक गीत गाऊन गड परिसरात भक्तिमय वातावरण आणि नवे चैतन्य निर्माण झाले.

ठाणे-रायगड जिल्ह्यातील भाविकांची मोठी उपस्थिती, जय श्रीरामच्या घोषणा आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा उत्सव शांततेत पार पडला.
डोंबिवली सोनारपाडा जमीनवादातून मारहाण प्रकरण !शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या विकासक आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करा - सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी
भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी मलंग रोड
 वरील डांबरीकरणाच्या कामाची पाहणी ,गणेशोत्सव 
वापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याच्या केल्या सूचना
चिमुकल्या विद्यार्थिनींच्या हातून पत्रकार, पोलिसांसह महापौरांच्या हातावर राखी!

बालक मंदिर शाळेतील विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम; रक्षाबंधनानिमित्त प्रेम, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश

बालक मंदिर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करत समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनींनी पत्रकार, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच महापौरांच्या हातावर राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी चिमुकल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या निरागस भावनांनी उपस्थितांचे मन जिंकले. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती, जनतेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांप्रती तसेच शहराच्या विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापौरांप्रती विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

चिमुकल्या विद्यार्थिनींच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे रक्षाबंधनाच्या सणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. प्रेम, स्नेह, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत कल्याणच्या गणेश घाटावर नारळ अर्पण करून केली सुरक्षित मासेमारीसाठी प्रार्थना

नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या गणेश घाटावर खाडी किनारी कोळी बांधवांनी पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने हजेरी लावली. 

पारंपरिक वेशभूषेत दाखल झालेल्या कोळी बांधवांनी विधीवत पूजा करून समुद्रदेवतेला नारळ अर्पण केला.

समुद्राशी असलेले नाते आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेली परंपरा कायम ठेवत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

 यावेळी समुद्र शांत राहावा, मासेमारीचा हंगाम सुखकर जावा आणि कोळी बांधवांचे जीवन सुरक्षित राहावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
कल्याण मध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह ,नारळी पौर्णिमेनिमित्त
भव्य मिरवणूक,आमदार विश्वनाथ भोईर ,महापौर 
हर्षाली थविल चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी कोळी
 बांधव पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी
कल्याण श्री मलंग रोड नांदीवलीत नारळी पौर्णिमेचा उत्साह

नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक, कोळी बंधू पारंपारिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी
भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात तब्बल १० हजार वृक्षलागवड
जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ हीच खरी संपत्ती - माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण :भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील कल्याण पश्चिम, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड आदी विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते, नागरिक तसेच त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा के
महागाईविरोधात कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसची ‘अंत्यसंस्कार यात्रा’; तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा sugar daddy असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा 

साखरेच्या दरवाढीविरोधात कल्याण-डोंबिवली युवक काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तहसील कार्यालयापर्यंत ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढन्यात आला . यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली . वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केली
कल्याणच्या कोळशेवाडीत परिसरातील धक्कादायक घटना!

जोर जबरदस्तीने चार अल्पवयीन मुलींना घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघड

बेपत्ता मुलीने आईला  मेसेज आणि लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने समोर आला संपूर्ण प्रकार

आईचा 112 वर कॉल, पोलिस आणि नातेवाईकांची तातडीची धाव; संबंधित मुलीसह आणखी तीन अल्पवयीन मुलींची केली सुटका

याप्रकरणी चेतन माने नावाच्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात . चेतन वर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याची माहिती

या आरोपीने या चार अल्पवयीन मुलींना नेमकं का डांबून ठेवलं होतं? त्यांच्यावर कोणताही अत्याचार झाला आहे का? याचा कोळशेवाडी पोलिसांकडून गुंन्हा दाखल करत सखोल तपास सुरू
कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातKDMC ची धडक कारवाई
कल्याण पूर्व कैलास नगर परिसरात बिल्डरकडून गरीबाच्या घराची तोडफोड करत नुकसान केल्याचा आरोप,शिवसेना संपर्क प्रमुख नगरसेवक महेश गायकवाड संतापले.. संबधित बिल्डरविरोधात कारवाई करण्याची केली मागणी
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

 जयेश वसंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोळवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांसोबत जयेश वसंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास रविंद्र हरी भंडारी, रक्षित गायकर (मनसे सचिव), रोहित रविंद्र भंडारी तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
कल्याण आधारवाडी  परिसरातील आदिवासी पाड्याची महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी KDMC अधिकाऱ्यांसह केली पाहणी

आदिवासी पाड्यातील गैरसोयी पाहून महापौर संतापल्या ,तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केल्या सूचना
रानभाज्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने सुभेदार वाडा कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मंदिर शाळेत रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांनी प्रदर्शनात विशेष सहभाग घेत नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या सुमारे २५ प्रकारच्या रानभाज्या मांडल्या. आघाडा, अळू, अंबाडी, गुळवेल, चाकवत, करटोली, रानमेथी, माठ, शेवगा, भारंगी, भोकर, टाकळा आदी रानभाज्यांचा यामध्ये समावेश होता.
डोंबिवली मधील धक्कादायक घटना

डिलिव्हरी बॉय म्हणून आला आणि साडेचार तोळ्याची सोन्याची चैन केली लंपास

विष्णुनगर पोलिसांनी चोरटा प्रवीण बोचरे याला ठोकल्या बेड्या
कल्याण मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा  उत्साह

मुस्लिम बांधवांकडून भव्य मिरवणूक

हजारो मुस्लिम नागरिक मिरवणुकीत सहभागी
जिल्हा वार्ता IMPACT...
कल्याण पूर्वेतील SKY WALK वर अस्वच्छतेचे साम्राज्य,बातमी नंतर KDMC खडबडून जागे..साफसफाईला सुरुवात
धर्मवीर आनंद दिघेंच्या २५  व्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून विनम्र अभिवादन ,खासदार नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांनी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ वा स्मृतिदिन निमित्ताने शिवसैनिकांसह ठाण्यातील शक्तिस्थळ येथे भेट देऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, युवासेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण शीळ फाटा महापे पाईप लाईन रोड वर प्रचंड वाहतूक कोंडी,वाहनांच्या रांगा,VIDEO VIRAL
डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेत २६ ऑगस्टपासून एकल महिला नोंदणी अभियानाला सुरुवात

विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित व दिव्यांग महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी एकल महिला नोंदणी अभियानाला २६ ऑगस्ट २०२६ पासून डोंबिवली शिवसेना शाखेत सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील एकल महिलांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या अभियानात विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित, दिव्यांग तसेच इतर एकल महिलांनी सहभागी होऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीनंतर पात्र महिलांना आर्थिक सहाय्य व विविध कल्याणकारी योजना, स्वयंरोजगार व उद्योग प्रशिक्षण, आरोग्य सेवा, विमा कवच, गृहनिर्माण तसेच सुरक्षित निवारा यांसारख्या विविध उपक्रमांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हे नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पात्र एकल महिलांनी या अभियानाचा लाभ घेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
धर्मवीर आनंद दिघेंच्या २५व्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर
युवा सेना कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील यांच्याकडून विनम्र अभिवादन
कल्याण : धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील शक्तिस्थळ येथे युवा सेना कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी जितेन पाटील यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक कार्याला आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या योगदानाला उजाळा दिला.धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या कार्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण केलेले स्थान आजही कायम असून, त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी जितेन पाटील यांनी व्यक्त केला