Public App Logo
Profile Picture

Jilha Varta (जिल्हा वार्ता)

@jilhavarta
149Followers
0Following
Lकल्याण मधील खोटाल हाऊस या इमारतीत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांचा छापा

फसवणुकीच्या 12 गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सलमान डोलारे क्राइम ब्रांच पोलिसांनी घेतला ताब्यात

कुख्यात बिल्डर सलमान डोलारे घरात असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती

गेल्या दोन वर्षापासून ठाणे क्राइम ब्रांच, कल्याण क्राईम ब्रँच .,बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस शोध घेत होती.

कल्याण मधील आरक्षित भूखंडांवर खोटे कागदपत्र तयार करून अनेक इमारती सलमान डोलारे यांनी बांधले आहेत
ठाण्यातील खून प्रकरणातील दोन आरोपी २४ तासांच्या आत जेरबंद

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोड क्रमांक २ येथील हनुमान मंदिराजवळ ५ जून रोजी दीपक भूषण जैस्वार (वय २३) यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे.

प्राथमिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अजय देवकीलाल गिरी (वय २८, उत्तर प्रदेश) आणि शिवा संजय गोस्वामी (वय २५, उत्तर प्रदेश) यांची ओळख पटवली. आरोपी रेल्वेमार्गे गोरखपूर एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतील भोसलें यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींचा गुप्तपणे पाठलाग करत कसारा रेल्वे स्थानक परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या १२ संशयित इसमांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत सपोनि पल्लवी ढगेपाटील, श्रेणीपोनि सुनील अहिरे, सपोनि राजेंद्र चौधरी, पोना तेजस ठोंबरे आणि पोका मिनिनाथ शिकारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सदर कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पराग माने, तसेच पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाणे करीत आहे.
दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर जेरबंद; झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचची संयुक्त कारवाई
कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या शोधात असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. झोन-३ पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
आरक्षित भूखंडांवर बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सलमान डोलारे याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस तपासादरम्यान डोलारे हा कल्याणमधील दूधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
सलमान डोलारे याच्याविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाणे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात बारापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील युसूफ हाइट्ससह आरक्षित भूखंडांवर खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारती उभारल्याप्रकरणी देखील त्याच्याविरोधात गुन्हे नोंद आहेत.याशिवाय, इतर बेकायदा इमारती आणि बंगल्यांच्या बांधकामांशी संबंधित फसवणूक प्रकरणांमध्येही त्याचे नाव समोर आले आहे. जमीन व्यवहारांमध्ये नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल असून तलाठ्याची बनावट सही, बनावट शिक्के आणि खोटे दस्तऐवज तयार केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत.दरम्यान, सलमान डोलारेला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला असून पुढील तपास सुरू आहे.
टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

कल्याण कसारा दरम्यान मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

तिसरा आणि चौथ्या लाईनच्या कामादरम्यान सिग्नल वायर तुटल्याने  सिग्नल यंत्रणेत बिघाड

काही लोकल्स खोळंबल्याने प्रवाशांना नाहकत्रास
कल्याण पूर्व-पश्चिम उड्डाणपूल प्रकल्पावरून वाद,बुद्धभूमी
 फाउंडेशनच्या बैठकीत आनंदराज आंबेडकरांच्या बैठकीत
 तणावपूर्ण वातावरण ,नगरसेविका माया कांबळे यांना
 अपशब्द,VIDEO VIRAL
सेनापती सेनेशिवाय काही कामाचा नाही,तुमची भांडणं सोडवण्यासाठी आम्ही आमचा राजकीय बळी द्यायचा नाही ..म्हणून ठाकरे गटाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला -योगेंद्र भोईर यांचा ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना टोला
पर्यावरण दिनानिमित्त रेवती व गोवेली येथे वृक्षारोपण आणि जनजागृती रॅली

कल्याण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी मौजे रेवती येथील संरक्षित वन क्रमांक ४३ मधील वनक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वनपरिक्षेत्र अधिकारी, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विविध संस्था, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमास कल्याण ग्रामीण भाजप तालुकाध्यक्ष शेखर लोणे, नवगाव संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFM) चे अध्यक्ष व उपाध्यक्ष, वनविकास महामंडळ ठाणेचे वनपाल, वनरक्षक व कर्मचारी, दहागाव वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कुंदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच कारुण्य ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथील प्रा. भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. यानंतर रेवती व गोवेली गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.

रॅलीदरम्यान पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. "कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव" तसेच "माकड म्हणतो हुप हुप, झाडे लावा खूप खूप" अशा घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुरलीधर गोविंद जागकर, वनपाल दहागाव यांनी उपस्थितांचे आभार मानले. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शिवसेना उबाठाचे नगरसेवक संकेश भोईर यांच्या कार्यालयात  आधारकार्ड सहविविध शिबिरांचे आयोजन
रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रिक्षा टॅक्सी चालकांसाठी भरवली मराठीची शाळा

दर रविवारी एक तास घेतले गिरवले जाणार मराठी भाषेचे धडे
पत्री पूल परिसरात शिव मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पंजाबी चाळीतील घरावर भले मोठे झाड कोसळले, घराचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही
विठ्ठलवाडी ते प्रेम ऑटोदरम्यान  बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला 'तथागत गौतम बुद्धभूमी मार्ग" असे नामकरण करा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांची मागणी
कल्याण मोहन्यातील गोळीबार प्रकरणाचा धक्कादायक उलगडा!
विरोधकाचा WhatsApp स्टेटस ठेवल्याच्या रागातून गोळीबार, स्वतःवर गोळी झाडून रचला खोटा कट
अभिषेक उर्फ अभि पवारसह तिघांविरोधात गुन्हा दाखल; तिघांना अटक, मुख्य आरोपी उपचाराधीन
कल्याण : कल्याण जवळील मोहने पाटील नगर परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला . पोलीस तपासा दरम्यान या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेक उर्फ अभि पवारनेच संपूर्ण कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
    WhatsApp वर विरोधकाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी अभिषेक पवार आणि मोनू फुलोरे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत झाले होते. काल अभिषेक पवार आणि त्याचे दहा ते बारा साथीदार एका हळदीच्या कार्यक्रमातून रात्रीच्या सुमारास मोहन परिसरात आले. मोहन पाटील नग�
केडीएमसीचा जनता दरबार 9 जूनचा कार्यक्रम रद्द

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात 9 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी, नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयुक्तांच्या दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव 9 जून रोजी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

जनता दरबाराच्या पुढील तारखेची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.

अतिरिक्त आयुक्त-2 हर्षल गायकवाड यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार हे परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नातवाच्या स्टंटबाजीचा आजोबांना फटका - वाहतुक शाखेने ठोठावला २३ हजार ५०० दंड 
व्हायरल व्हिडीओतील स्कुटर वाहतुक पोलिसांनी केली जप्त!
कल्याण -कल्याण  खडकपाडा परिसरात चार अल्पवयीन मुले स्कुटरवर भरधाव वेगात स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडीओ स्थानिक न्यूज पोर्टल द्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कल्याण शहर वाहतूक उपशाखेने कारवाई सुरू केली. तपासाअंती माग काढत पोलीस श्रीराम राठोड यांच्यापर्यंत पोहचुन स्कुटर जप्त केली. ही स्कुटर त्यांचा १३ वर्षीय नातु चालवत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, पोलिसांनी विविध मोटार वाहन कायद्यांअंतर्गत तब्बल २३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.वाहतूक पोलिसांनी वाहनाचा मालकी हक्क आणि विक्रीची साखळी तपासून अखेर स्कुटर सध्या वापरत असलेल्या श्रीराम राठोड यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचले. चौकशीत चित्रिकरणातील मुलांपैकी एक मुलगा हा राठोड यांचा १३ वर्षीय नातू असल्याचे समोर आले. नातवाने घरातील चावी नकळत घेऊन मित्रांसह स्कुटर बाहेर नेल्याची कबुली राठोड यांनी दिली. व्हिडीओतील प्रकार खरा असल्याचेही त्यांनी मान्य केले. यानंतर अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवणे, परवाना नसताना वाहन देणे, बेदरकार वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर न करणे, ओव्हरलोडिंग आणि विमा नसणे अशा विविध उल्लंघनांबाबत एकूण २३ हजार ५०० रुपयांचे चलान न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच संबंधित स्कुटरही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या पथकाने केली.
स्टंटबाज स्कुटरच्या मालकांची रांग - तब्बल सहा मालक!
कल्याण खडकपाड्यातील स्टंटबाज स्कुटरच्या व्हायरल व्हिडिओनंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासात स्कुटरच्या मालकी हक्काचा भन्नाट प्रवास उलगडला. मूळ मालक आदित्य आखवे यांच्याकडून विविध डिलर्स आणि खरेदीदारांच्या माध्यमातून स्कुटर सारीका भिंगारदिवे, परविंदरकौर भामरा, जावेद खान असे तब्बल पाच मालक बदलून अखेर बेतुरकर पाड्यातील श्रीराम राठोड यांच्याकडे स्कुटर पोहोचल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, स्कुटरची आरटीओ नोंदणी अद्यापही हस्तांतरित न झाल्याने मालकीबाबत गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे व्हायरल चित्रिकरणातील अल्पवयीन चालक व इतर मुलांवर आणि स्कुटरचा ताबा असलेले श्रीराम राठोड यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण जवळील मोहने पाटील नगर परिसरात
काल रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना....

अभिषेक पवार नावाचा तरुण जखमी असल्याची प्राथमिक माहिती .....

खडकपाडा पोलिसांचा तपास सुरू ......
विवेकानंद सेवा मंडळात ७ जून रोजी ‘डिस्कव्हर इंजिनिअरिंग’ मार्गदर्शन सत्र

डोंबिवली : अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने विवेकानंद सेवा मंडळाच्या वतीने ‘डिस्कव्हर इंजिनिअरिंग’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सत्र शनिवार, ७ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ज्ञान मंदिर, दुसरा मजला, दत्ता नगर चौक, संगीता वाडी, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी हे सत्र खुले आहे.

या संवादात्मक सत्रात संगणक, यांत्रिकी, स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी अशा विविध शाखांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड्स, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या वाटांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना या सत्रादरम्यान तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची, विविध शंकांचे निरसन करून घेण्याची तसेच आपल्या आवडीनुसार आणि क्षमतांनुसार योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अभियांत्रिकी शिक्षण आणि करिअरविषयी सखोल माहिती मिळविण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व मदत कक्ष संपर्क : 84509 19330
केडीएमसीचा जनता दरबार ७ जूनचा कार्यक्रम रद्द

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारा जनता दरबार कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी, नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत आयुक्तांच्या दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव ७ जून रोजी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

जनता दरबाराच्या पुढील तारखेची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.

अतिरिक्त आयुक्त-२ हर्षल गायकवाड यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार हे परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसीचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने बिरला महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभाग, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, बिरला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रा, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उद्यान अधीक्षक संजय जाधव, नगरसेविका अनघा देवळेकर, डॉ. तनुजा वायले, प्रमिला पाटील, नगरसेवक किरण भांगले, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, वरिष्ठ उपप्राचार्य हरीश दुबे, मनिंदर कौर यांच्यासह प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमादरम्यान विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि शहराचा हरित विकास या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त अभिनव गोयल यांनी वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. केडीएमसीने यावर्षी सुमारे १.५० लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून नागरिक, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक आणि हरित शहर उभारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणारा आणि हरित भविष्यासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कल्याण पूर्व येथील आडीवली ढोकळे प्रभागातील विविध समस्यांबाबत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
अंबरनाथमध्ये 3 वर्षीय कोब्राच्या दंशाने चिमुकल्याचा मृत्यू

उपचारात हलगर्जीपणाचा आरोप
करत नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

तर दुसरीकडे डॉक्टरांनी कुटुंबाने केलेले सर्व फेटाळले

कुटुंबाने रुग्णालयातआणला साप
KDMC हद्दीतील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या देखभालीकरिता फिरते सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत - भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांची KDMC आयुक्तांकडे मागणी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खान्देश दौऱ्याला सुरुवात
नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील विविध पक्षीय कार्यक्रम, बैठका तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वांद्रे टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करत आज सकाळी नंदुरबार साठी रवाना
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपकडून डोंबिवली जुने आयरे रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी जपण्याचा संकल्प 

डोंबिवली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी जुना आयरे रोड, डोंबिवली पूर्वेत  भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रणव केणे, राहुल केणे, श्रावण पाटील, अनंत भोईर, राकेश पाटील, शंकर म्हात्रे, संतोष विचारे, धर्मेश ठाकरे, शिवाजी कांबळे, गीता कुमठाकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक जयंत गाडे, सुमित एल्कोचे पदाधिकारी, सुपरवायझर कारण कालन, हृषीकेश गोरपेकर, युनिट ऑफिसर किरण पवा�
बुद्धभूमी फाउंडेशन जमीन प्रकरणारत नागरिकांना मनातील गैरसमज दूर करण्याचे आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी केला जाणारा अपप्रचार थांबवा - नगररसेविका माया कांबळे यांचे आवाहन
कल्याण जवळील राया-खडवली मार्गावरील ८५ अनधिकृत गाळ्यांवर  बुलडोझर; महसूल विभागाची मोठी कारवाई
85 अनधिकृत गाळे जमीनदोस्त
Jilha Varta (जिल्हा वार्ता) (@jilhavarta) | Public App