Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट लोणी काळभोर, ता. २३ : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी जन्मभूमी, समाज आणि संस्कारांची नाळ कायम जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट येथील 'समर्पण वृद्धाश्रम' येथे जलशुद्धीकरण यंत्रणा (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) बसवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. . . . #40YearsOfFriendship #HelpingHands #SeniorCitizenCare #GivingBackToSociety #SchoolFriendsForever #AlumniGivingBack #SocialResponsibility #LoniKalbhor #OldAgeHomeSupport #InspirationalStories

Haveli, Pune | Jun 24, 2026

MORE NEWS

"पोलीस आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली" उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांचा गंभीर आरोप...
.
.
उरुळी कांचन: "पोलीस प्रशासन आणि शेजारच्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आता माझ्यावर कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली आहे," असा खळबळजनक आणि गंभीर आरोप उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांनी केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने आणि त्यातच पोलिसांकडून असहकार्य किंवा उलट त्रास होत असल्याचा आरोप करत खलसे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. बळीराजाला आपल्याच हक्कासाठी जर अशा प्रकारे कुटुंबासह मृत्यूला कवटाळण्याची भाषा करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संदीप खलसे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल.
.
.
.
#UruliKanchan | #PuneCrime | #FarmerJustice | #PunePolice | #SandeepKhalse | #MaharashtraFarmers | #UruliKanchanNews | #CrimeNews | #बळीराजा | #मराठीबातम्या

"पोलीस आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली" उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांचा गंभीर आरोप... . . उरुळी कांचन: "पोलीस प्रशासन आणि शेजारच्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून आता माझ्यावर कुटुंबासह जीव देण्याची वेळ आली आहे," असा खळबळजनक आणि गंभीर आरोप उरुळी कांचन येथील शेतकरी संदीप खलसे यांनी केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने आणि त्यातच पोलिसांकडून असहकार्य किंवा उलट त्रास होत असल्याचा आरोप करत खलसे कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. बळीराजाला आपल्याच हक्कासाठी जर अशा प्रकारे कुटुंबासह मृत्यूला कवटाळण्याची भाषा करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संदीप खलसे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा अनपेक्षित दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार असेल. . . . #UruliKanchan | #PuneCrime | #FarmerJustice | #PunePolice | #SandeepKhalse | #MaharashtraFarmers | #UruliKanchanNews | #CrimeNews | #बळीराजा | #मराठीबातम्या

Haveli, Pune | Jun 24, 2026