रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद काहीसा संथ असला, तरी दुपारी ३ नंतर मतदारांनी केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान झाले असून सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.