आज मंगळवेढा येथे आबासाहेब लांडे (तालुका प्रमुख, शिवसेना) यांच्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते संपन्न झाले. या नव्या जनसंपर्क कार्यालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी तत्परतेने सोडविणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि शिवसेनेचे संघटन अधिक बळकट करणे हे महत्त्वाचे कार्य घडून येईल, असा मला विश्वास आहे. यावेळी नागरिकांना संबोधित करत असताना शिवसेनेची शाखा ही केवळ कार्यालय नसून ती आपल्या संस्कृतीचा, विचारांचा आणि कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व जिल्ह्यात उभारलेल्या शाखांमधूनच खरे शिवसैनिक घडतात, समाजासाठी लढण्याची ताकद निर्माण होते आणि जनतेशी थेट नाळ जोडली जाते. असे मत व्यक्त केले.