उरण: उरणच्या विकासात हरवतेय पारंपरिक भातशेती
Uran, Raigad | May 13, 2026 एकेकाळी निसर्गरम्य खाडीकिनारा, पांढरीशुभ्र मिठागरे आणि हिरव्यागार भातशेतीने नटलेला उरण तालुका आज विकासाच्या महामार्गावर धावत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी बंदर आणि प्रस्तावित तिसरी मुंबई यांसारख्या महाप्रकल्पामुळे उरण भविष्याचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी या सिमेंटच्या जंगलात उरणची पारंपरिक भातशेती मात्र झपाट्याने नष्ट होत आहे.