बदनापूर: कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजूर महिलांच्या अंगावर ट्रक,6 सहा महिला ठार झाल्याची माहिती
आज दिनांक 1 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5:30वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील जालना समृद्धी महामार्गावर मजुराचे काम करणाऱ्या सहा महिलांवर नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिल्याने या ट्रक खाली येऊन सहा महिला चिराडल्या गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मयत महिलांची नावे कळू शकली नाही, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.