उरण: तिसऱ्या मुंबईसाठी जमिनी न देण्याचा निर्धार
Uran, Raigad | Jun 11, 2026 सरकारला तिसरी मुंबई उभी करायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या प्रेतावर उभी करावी लागेल असे परखड मत माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी मांडले. एमएमआरडीएच्या प्रस्तावित कर्नाळा साई चिरनेर (के एस सी) नवनगर तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी चिरनेर येथील, चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक भूमीत रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोळसे पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी तिसऱ्या मुंबईला जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.