पोलादपूर: आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम; मातीचे ओसरे कोसळल्याने धोका वाढला
पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटावर दरडी कोसळण्याचे संकट कायम आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी रानकडसरी, दाभिल टोक तसेच घाटातील अन्य काही ठिकाणी मातीचे ओसरे कोसळल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो आंबेनळी घाट टाळून पुणे किंवा कराड-चिपळूण या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.