राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित असलेले मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. या बदलामुळे निवडणूक प्रचाराच्या मुदतीतही बदल झाला असून, आता जाहीर प्रचार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता थांबणार आहे.