महाड: मुंबई-गोवा महामार्गावर हिरवाईचा बळी
Mahad, Raigad | Apr 23, 2026 गेल्या तब्बल 16 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाने विकासाचे स्वप्न दाखवले असले, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र समोर येत आहे. महामार्गालगत असलेली हिरवाई नामशेष होत असून, प्रचंड उष्णता, पाण्याअभावी आणि देखभालीच्या दुर्लक्षामुळे नव्याने लावण्यात आलेली झाडेही करपून नष्ट झाली आहेत. परिणामी, एकेकाळी निसर्गरम्य वाटणारा हा मार्ग आज ओसाड, उजाड आणि तापलेल्या पट्टयासारखा दिसू लागला आहे.