पेण तालुक्यातील शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून वाशी-शिर्की खारेपाट परिसरावर तीन दिवस आड येणारे पिण्याचे पाणी आत्ता सात दिवस आड पाणी पुरवठा लादण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. शहापाडा ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत समाविष्ठ गाव-परिसरांत जी "पाणीटंचाई” दाखवली जात आहे, ती वास्तवात नैसर्गिक किंवा तांत्रिक नसून मानव निर्मित व कृत्रिम आहे, हे वस्तुस्थिती पाहणाऱ्या, या विषयांत भाग घेतलेल्या प्रत्येकाला स्पष्ट दिसत आहे.