महाड: पाणीटंचाईतही गांधारी ठरतेय 'जीवनदायिनी'
Mahad, Raigad | Jun 4, 2026 राज्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रायगड विभागातील अनेक गावांसाठी मात्र गांधारी नदी जीवनदायिनी ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या नदीला झालेले सिमेंट काँक्रीटचे बंधारे. कोथुर्डे धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला असतानाही मे महिन्याच्या अखेरपर्यंत गांधारी नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.