पालघर: वेढी येथे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू, केळवा सागरी पोलिसांत घटनेची नोंद
पालघर तालुक्यातील वेढी येथे एका इसमाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोरेश्वर लोहार बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे तुटलेल्या प्रवाहित विद्युत तारेत त्यांची एक बकरी अडकली या बकरीला काढण्यासाठी लोहार गेले असता त्यांना देखील विजेचा धक्का लागला. मोरेश्वर लोहार यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.