घरकुल योजनेचा मूळ उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हा असताना, प्रत्यक्षात या योजनेच्या लाभार्थ्यांनाच सर्वाधिक फटका बसत असल्याची गंभीर तक्रार काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी 11 डिसेंबर रोजी दु. 3.05 वा. दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. मोफत रेती (वाळू) देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी, ती प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणारा वाहतुकीचा (ट्रान्सपोर्ट) खर्च पाहता, ग्रामीण भागातील घरकुल योजना केवळ कागदावरच राहील की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला..