एकेकाळी ग्रामीण जीवनाचा कणा मानला जाणारा लोहार व्यवसाय आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. श्रीवर्धन तालुक्यात पारंपरिक लोहारकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या कलेचा वारसा जपणारे मोजकेच हात आजही धगधगत्या भट्टीसमोर झगडताना दिसत आहेत.