श्रीवर्धन: रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर
रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. 1 जून 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे आणि 258 वाड्यांतील तब्बल 1 लाख 31 हजार 99 नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले सर्व टँकर खासगी स्वरूपाचे असून शासकीय अथवा मदत स्वरूपातील कोणताही टँकर कार्यरत नाही.