पेण: दफ्तर दिरंगाईचा रायगडातील शेतक-यांना फटका
Pen, Raigad | Apr 12, 2026 नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाच्या पाण्यामुळे किनारपट्टीलगतचे संरक्षणात्मक बंधारे कमजोर झाले आहेत; मात्र त्यांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविलेला 75 कोटी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.