कर्जत: कर्जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या
Karjat, Raigad | Apr 26, 2026 कर्जत तालुक्यातील दोन नद्या बारमाही वाहत असतात. तर दोन प्रमुख नद्या आणि उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई वाढली असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात शासनाने टँकर सुरू केले आहेत. तालुक्यातील चार गावे आणि चार वाड्या यांना शासनाच्या टँकरमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून आणखी चार गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.