पोलादपूर: रायगडमधील 225 दरडप्रवण गावांना हायटेक सुरक्षा
रायगड जिल्ह्यातील तीव्र दरडप्रवण 225 गावांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आता थेट गावागावांत सेंट्रलाईज्ड पब्लिक अॅड्रेस सिस्टिम (सीपीएएस) बसवण्यात येत आहे. आता पर्यंत 225 गावांपैकी 100 गावांमध्ये ही सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली असून येत्या पावसाळ्या पूर्वी उर्वरित 125 गावांमध्येही कार्यान्वित होईल अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.