पेण: तिसरी मुंबई प्रकल्पाच्या विरोधात 19 हजार हरकती
Pen, Raigad | Apr 26, 2026 पेण तालुक्यातील कळवे गावात शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित तिसरी मुंबईच्या 'नव नगर' प्रकल्पासाठी जमिन संपादना संदर्भात आयोजित बैठकीत प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. या प्रकल्पाच्या विरोधात 19 हजार हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. तरीही याबाबत कोणतीही सुनावणी घेण्यात आली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत.