बारावीची परीक्षा सुरू असतानाच नागपुरातून पेपर फुटी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री चे पेपर परीक्षेच्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्याच्या व्हाट्सअप ग्रुप वर उपलब्ध झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून या विषयावर मंत्री भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे .