कर्जत: टोरंट प्रकल्पासाठी गाव सोडणार नाही
Karjat, Raigad | Jun 27, 2026 कर्जत तालुयातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापनाची भीती निर्माण झाली असून, मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी टोरंट पॉवर प्रकल्पासाठी आम्ही आमचे गाव सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. मल्टीवाडीत सध्या पाच कुटुंबे वास्तव्यास असून, अनेक पिढ्यांपासून ती साई डोंगर परिसरातील जंगलात वास्तव्यास आहेत. प्रस्तावित प्रकल्पासाठी धरण उभारण्यात येणार असल्याने या कुटुंबांना आपली घरे आणि जमीन सोडावी लागेल, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.