जाफराबाद: खासगाव येथे जनावरांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यावर लावला पाण्याचा फवारा
आज जालना जिल्ह्यासह जाफराबाद तालुक्यात 42 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 14 मे 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता. खासगाव येथील शेतकरी अरविंद कुलकर्णी यांनी आपल्या जनावरांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी चक्क जनावरांच्या गोठ्यावर पाण्याचा फवारा लावले असल्याचे पाहायला मिळाले आहे. या पाण्याच्या फवाऱ्यामुळे या जनावरांचे उन्हापासून संरक्षण होईल या हेतूने या शेतकऱ्याने हे पाण्याचे फवारे जनावरांच्या गोठ्यावर लावले.