पोलादपूर: उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा
मोसमी पावसाच्या चार महिन्यांतील पहिला पंधरवडा कोरडा गेला. पावसाळा सुरू होऊनही पावसाचेच आगमन होत नसल्याने दक्षिण रायगड वासीयांना पावसाची तीव्र ओढ निर्माण झाली होती. अखेरीस रविवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाळ्यातील पहिल्या सरी बरसल्या असून, नागरिक सुखावले आहेत. तर शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलादपूर तालुक्यातील काही भागात माती व दगड कोसळण्याच दाट शक्यता निर्माण झाली आहे. याची प्रचिती गाजवणे मार्गवर दगड खाली आल्याने आगामी चार महिने महत्वपूर्ण व कासोटीचे ठरणार आहे.