श्रीवर्धन: भावाच्या उत्तरकार्याला निघाले, वाटेतच मृत्यूने गाठले
राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक भीषण अपघात झाला, या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर कार्यासाठी गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने झडप घालत, आनंदाच्या क्षणाआधीच दुःखाची छाया पसरवणारी हृदयद्रावक घटना म्हसळा तालुक्यात घडली. जांभूळ गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात पतीचा पत्नीच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी होऊन जीवनाशी झुंज देत आहे.