श्रीवर्धन: अवकाळी पावसाने महावितरणची यंत्रणा उद्ध्वस्त
8 आणि 9 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पनवेल ग्रामीण, कर्जत आणि खालापूर परिसरात आलेल्या अवकाळी वादळी पावसाने महावितरणच्या वीज यंत्रणेची दाणादाण उडवली. वेगाने वाहणारे वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते, तारा तुटून पडल्याने शेकडो गावे अंधारात बुडाली होती. मात्र, महावितरणच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण करुन वीज पुरवठा पूर्ववत सूरु केला असल्याची माहिती महावितरणच्या पेण मंडळाचे अधिक्षक अधिक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली आहे.