रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात अचानक झालेल्या भीषण चक्रीवादळाने आणि अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की, शेतात कापणीवर आलेली केळीची झाडे उन्मळून पडली. उभ्या बागा मातीमोल झालेल्या पाहून अनेक शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच ढसाढसा रडू कोसळले.
#Jalgaon #Raver #JalgaonLive #Muktainagar