Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
पेट्रोल
Up
मध्यप्रदेश
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Mp
Cm
Nsui
उत्तरप्रदेश
ravikant6021
...त्यांची आता राजकीय जलसमाधी घेण्याची वेळ ,३० वर्षात धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवता आले नाहीत हे त्यांचे राजकीय अपयश आहे, त्यांचेकडे विकासाचे कसलेली व्हिजन नाही. त्यामुळे आता परिवर्तनासाठी जनता सज्ज : संदीप पवार
Jaoli, Satara
| Jul 30, 2026
MORE NEWS
पर्यटन स्थळावर अजित दादा यांना भावपूर्ण आदरांजली : सर्वपक्षीय शोकसभा
Jaoli, Satara | Jul 30, 2026
पेंच व्याघ्रमधील 'लाडो' बनली सह्याद्रीत 'हिरकणी' बामणोली: पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'ऑपरेशन तारा' उपक्रमाअंतर्गत वनविभागाने शनिवारी (दि. ७) सकाळी आणखी एका वाघिणीचे यशस्वी स्थलांतर केले, पैच व्याच प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून आणलेल्या या 'लाडो' नावाच्या वाधिणीस कोअर क्षेत्रातील डिसोली येथे नदीकिनारी निसर्गमुक्त केले. यामुळे डिचोली, अंगटी, पाली, करंजवडे, शिरशिंगे या एकेकाळी पट्टेरी वाघाचं अस्तित्व खोऱ्यांमध्ये काही दशकांनंतर आता पुन्हा दिसणार आहे.
Jaoli, Satara | Jul 30, 2026
महाबळेश्वरमध्ये ५०९ कर्मचाऱ्यांनी घेतले 'ईव्हीएम'चे धडे; निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने मार्गदर्शन महाबळेश्वर , तारीख. २३ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या प्रक्रियेचा कणा असलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सज्जता पूर्ण झाली आहे. येथील शेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या सभागृहात आज पार पडलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात ५०९ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्यपद्धती आणि 'ईव्हीएम' हाताळणीचे सखोल ज्ञान आत्मसात केले. या सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांना लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी 'टीम वर्क'चा मंत्र दिला. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या चार तासांच्या प्रशिक्षण सत्रात १२६ केंद्राध्यक्ष आणि ३८३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग होता. प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण 'ईव्हीएम हँड्स ऑन' सराव ठरले. मतदान केंद्र सज्ज करण्यापासून ते मतदानाची गोपनीयत राखण्यापर्यंतच्या तांत्रिक बाबींचे सादरीकरण श्रीमती वैशाली राजमाने यांनी केले. केवळ नियम न सांगता, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावर काढायचे तोडगे त्यांनी समर्पक उदाहरणांसह मांडले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. मतदान प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी चिन्हांकित मतदार यादीचे वाचन आणि त्यातील तांत्रिक बारकावे समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर या सत्रात विशेष भर देण्यात आला. श्री. सचिन म्हस्के यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांमधील सुसंवाद हाच यशस्वी मतदानाचा आधार असल्याचे सांगत संघभावनेने काम करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणाच्या शेवटी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्रशासनाच्या या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे आता महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज झाली असून, पारदर्शक निवडणुकांसाठी हे सत्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
Jaoli, Satara | Jul 30, 2026
पुस्तकांच्या गावांनजिक कासवंड येथेबिबट्याची दहशत ! Holygram Krushi Paryatan निवास येथे रात्रीच्या वेळी वावर ; कोंबड्या केल्या फस्त, बिबट्याची झडप सीसीटीव्ही मध्ये कैद; परिसरात भीतीचे वातावरण
Jaoli, Satara | Jul 30, 2026
पाचगणीचे टेबलँडरवरून टॉवरपर्यंत… संघर्षातून उभा राहिलेला ‘प्रशांत महासागर’!”: “११ व्या वर्षी हातात कणसे… आज शेकडोंच्या डोक्यावर छप्पर : प्रशांत शारदा अशोक मोरे नावाचा माणूस!” यांस लोकमत अवॉर्डने जागतिक मंचावर सिने अभिनेते बोमन इराणी, व अमृता फडणवीस तसेच राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.. हार्दिक अभिनंदन..✨💫🎯💥🌹
Jaoli, Satara | Jul 30, 2026
पाचगणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली..छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली शोकसभा..
Jaoli, Satara | Jul 30, 2026
पाचगणी..
Jaoli, Satara | Jul 30, 2026
मृत्यूचा थरार! मेटतळ्याच्या भीषण दरीत कोसळून रानगव्याने सोडले प्राण; आंबेनळी घाटात मानव-वन्यजीव संघर्षाचा बळी महाबळेश्वर : निसर्गाच्या कुशीत वावरणाऱ्या एका धिप्पाड रानगव्याचा आंबेनळी घाटाच्या भीषण दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला. मेटतळ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावरून तोल गेल्याने हा महाकाय प्राणी थेट खोल दरीत कोसळला आणि घाटाच्या मुख्य रस्त्यावर येऊन पडला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घाटातील वळणावळणाच्या रस्त्यावर रानगवा मृत अवस्थेत पडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृत रानगव्याला बाजूला करून रस्ता मोकळा केला. हा अपघात इतका भीषण होता की, कड्यावरून घसरत असताना रानगव्याला स्वतःला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, ही घटना केवळ एक अपघात नसून मानव आणि निसर्ग यांच्यातील ढासळत चाललेल्या समतोलाचे दर्शन घडवणारी आहे. वाढती वाहनसंख्या आणि जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे रानगवे, बिबटे यांसारखे प्राणी सातत्याने रस्त्यावर येत आहेत. आंबेनळी घाटासारख्या संवेदनशील भागात आता तरी वेगमर्यादा आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.
Jaoli, Satara | Jul 30, 2026