मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पादन व विक्री संदर्भातील गंभीर प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी आज दि २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दिडच्या सुमारास विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत बळीराजाला न्याय देण्याचे आवाहन केले. उत्पादन खर्च वाढत असताना योग्य बाजारभाव मिळत नसल्याची स्थिती त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.