कोरेगाव: सरकारने अण्णा भाऊ साठेंच्या कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न द्यावा: आरपीआय आठवले गटाचे गायकवाड
अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला. गिरणी कामगारांचा लढा असो अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले. केंद्र सरकारने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, अशी अपेक्षा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केली.