हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने आज खालापूर तालुक्यातील खोपोली येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुप्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गायलेले 'हिंद-दी-चादर' हे गीत सादर केले.या ऐतिहासिक उपक्रमाची दखल 'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्डने घेतली असून, अप्पर आयुक्त वैशाली इंदानी यांनी आगामी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे.