रामटेक: खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरधन च्या महिलांचा पुढाकार; दशपर्णी अर्क बनवून दिला सेंद्रिय खताचा पर्याय
Ramtek, Nagpur | May 27, 2026 नारी महिला शेतकरी गटाने अभिनव उपक्रम राबवित खतंटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुढाकार घेत दशपर्णी अर्क बनवून सेंद्रिय पर्याय दिला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे विविध वस्तूंची पुरवठा सेवा विस्कळीत झाल्याने कृषी क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. मात्र यंदा खतांचा पुरेसा पुरवठा होणार की नाही याबाबत शासन आहे या परिस्थितीत सेंद्रिय खते हा पर्याय ठरू शकतो.