नाव्हा रोड परिसरातील शेतजमीन खरेदी व्यवहारात 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार इसार पावती करूनही खरेदीखत न देता तीच जमीन तृतीय पक्षास विक्री केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रविंद्र हरिभाऊ राऊत रा. राऊत नगर, जालना यांनी दिलेल्या जबाबानुसार, 20 मे 2024 रोजी त्यांची बैठक होऊन विसर पावतीचा निर्णय झाला होता.