महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व समाजसेवी संस्थांच्या सहभागातून भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. तब्बल दोन हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ झाडू हाती घेऊन रस्त्यावर उतरले आणि श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर, येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी, अरिहंत चौक, लेणी परिसर तसेच गावातील प्रमुख मैदाने स्वच्छ करण्यात आली.