पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पनवेल महानगरपालिकेने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत ‘अमृत शहरे’ (३ ते १० लाख लोकसंख्या) गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या वतीने महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे आदींनी पुरस्कार स्वीकारला.