जालना तालुक्यातील जळगाव परिसरात जळीतकांडाच्या घटनांमध्ये वाढ होत असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्धव शिवाजी पठारे यांच्या गट क्रमांक 117 मधील शेतातील सुमारे पाच एकर क्षेत्रावरील कापणी करून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून संबंधित शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.