पाच महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ दुचाकी अपघाताच्या कारणावरून भारतीय सैन्यातील जवानावर दगड व लोखंडी आकड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील ममदाबाद तांडा येथे घडली आहे. बधुवार दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामराव लाहाणु चव्हाण रा.ममदाबाद तांडा यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार,त्यांचा मुलगा आसाराम रामराव चव्हाण हा भारतीय सैन्यात कार्यरत आहे.