राज्यातील तसेच जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या पार्श्वभूमीवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी देण्याची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून निवडणुका जाहीर होईपर्यंत सरपंचच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार असल्याचे राज्य सरकारने निर्देश जारी केले आहेत.ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणुका जाहीर न झाल्यामुळे हा आदेश दिला.