७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी ५,८०,०००/- रुपये किमतीचे हरवलेले ५८ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले
तुळींज पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी – मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय तुळींज पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने, मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करून २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूण ५,८०,०००/- रुपये किमतीचे ५८ मोबाईल फोन तक्रारदारांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.