जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे शेतातील फळबाग जळून खाक झाल्याची घटना घडली. सोमवार दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या आगीत शेतातील झाडे व सिंचन व्यवस्था पूर्णतः जळाल्याने अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहंकार देऊळगाव येथील गट क्रमांक 60 मधील शेताच्या मालक श्रीमती सुशीलाबाई विठ्ठलराव पवार असून शेताची देखरेख त्यांचे पुत्र व सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ विठ्ठलराव पवार करतात.