ग्रामीण भागात जनसामान्यांची प्रवासातील आवडती लालपरीचा प्रवास हा अत्यंत सुलभ व परवडणारा प्रवास आहे. आजही लालपरी मध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त संख्या ही सामान्य जनतेची आहे. एस टी महामंडळाच्या वतीने राज्यभरात अनेक लालपरी धावत असतात, परंतु आजही काही भागात एस टी महामंडळाची बससेवा पोहोचली नाही, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली चांदुर बाजार मार्गावरील अनेक गावांचा समावेश आहे. येथील नागरिकांनी सदर बाब ही भाजपा अमरावती जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली.