अंबरनाथ: अंबरनाथ येथील बंजारा वडार समाज वस्तीला बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश येवले यांनी दिली भेट
अंबरनाथ भाजी मार्केटच्या मागे डवरी गोसावी नाथपंथी बंजारा वडार समाजवस्तीला २६ फेब्रवारीला आग लागली व तब्बल ५० घरे उध्वस्त झाली. अंबरनाथ नगरपालिकेने कुठलेच सहकार्य केले नाही व ५० घरांचे कुटुंब बेघर झाले आहे यावेळी अंबरनाथचे आमदार किणीकर यांनी भेट देऊन प्रत्येकी १००००/- देण्याची घोषणा केली परंतु अद्याप एकालाही दिले नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश येलवे यांनी भेट घेऊन आढावा घेतला आहे.