विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 13 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा असलेला उपसा जलसिंचन योजनांचा विषय जोरकसपणे उपस्थित केला. सिंचन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडला. डॉ. फुके यांनी या प्रश्नावर सरकारकडून ठोस आणि तातडीचे उत्तर मिळवण्याची मागणी